-
तथागत बुद्धांचा दार्शनिक संघर्ष: एक शोध
डॉ.प्रकाश कांबळे,
Abstract:
तत्त्वज्ञानाच्या जागतिक इतिहासामध्ये चैतन्यावाद व जडवाद किंवा अध्यात्मवाद विरुद्ध भौतिकवाद असे दोन तट आहेत.अर्थात भारतातही हेच दोन मुख्य तट आहेत.चैतन्यवाद पारलौकिक जगाचा विचार करते,तर जडवाद इहलोकाचा विचार महत्त्वाचा आणि मुलभूत मानते.जगाची निर्मिती कशी झाली याच्याशी जडवादाला घेणेदेणे नाही,तर हे जग स्वतःच्या पायावर कसे उभा राहील हे पाहणे तत्त्वज्ञानाचे काम असते हे जडवादाचे प्राणतत्त्व. म्हणूनच भारतीय विचारदर्शनातील पारंपरिक संघर्ष हा पश्चिमी परंपरेप्रमाणे अध्यात्मवाद विरुद्ध भौतिकवाद असा नसून तो ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणीअसे असल्याचे पुरेसे स्पष्ट झालेले आहे. भारतातील एकूण तत्त्वविचार या दोन छावण्यामधील अंतरक्रियेमुळे निर्माण झालेला आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.प्रस्तुत शोधनिबंधामध्येतथागत गौतम बुद्धांनी जो दार्शनिक संघर्ष केलेला आहे त्याचा विचार करावयाचा आहे.हे करत असतांना तथागतांचा संघर्ष कोणत्या दर्शनाशी झाला,या संघर्षाचे स्वरूप कसे होते व या संघर्षात त्यांनी कोणत्या शस्त्राचा अवलंब केला,याचा विचार केला जाणार आहे.