-
कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक आरोग्यावर मोबाईलच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
वर्षा विलास चांदेकर डॉ. सज्जन शंकरराव थूल
Abstract:
मोबाईल वर्तमान काळात सर्वात जास्त वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. मनोरंजन, शिक्षण, संपर्क, शॉपिंग इत्यादी विविध प्रकाच्या सुविधांचा उपयोग मोबाईलवर करता येतो. विशेष करून ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली कुमारावस्थेतील मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांवर कोणत्याही सामाजिक व भावनिक घटनेचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. कुमारावस्था ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील नवनवीन बदल घेऊन येणारी अवस्था असते. या अवस्थेत पहिल्यांदा विद्यार्थी त्याने न अनुभवलेले विश्व अनुभवत असतो.हे विद्यार्थी कधी तर प्रचंड आत्मविश्वासाने भारावलेले असतात तर कधी संभ्रमात असतात. या अवस्थेला वादळी अवस्थेचा काळ या कारणामुळेच म्हटले जात असते कि या अवस्थेतील विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणावर मानसिक बदलांना सामोरे जात असतो.या काळात मानसिक अवस्था अशी असते कि तो स्वत: आपले निर्णय घेण्याच्या परिपक्वतेत पोहचलेला नसतो. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालक व शिक्षकांनी चिकित्सकपणे त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करून त्यांच्यामध्ये होणारे बदल त्यांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यातून आपोआपच हे विद्यार्थी आपल्या पालकांशी व शिक्षकांशी मुक्तपणे संवाद साधू शकतील. त्यातून त्यांच्या शंकाचे निरसन होईल. यामुळे मोबाईलच्या होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेऊन योग्य ते मार्गदर्शन या काळात होणे गरजेचे असते.